बंगळुरू : एअर इंडिया एक्सप्रेस आजपासून (रविवार) बंगळुरू ते काठमांडू थेट विमानसेवा सुरू करणार आहे. हा नवीन मार्ग बँकॉक आणि फुकेत सारख्या कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी आमच्या अलिकडच्या विस्ताराचा एक भाग आहे,असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. एअरलाइनच्या संकेतस्थळावर या सेवेचे बुकिंग सुरू झाले आहे, ’एक्सप्रेस लाइट’साठी सुरुवातीचे भाडे आठ हजार रुपये आणि ’एक्सप्रेस व्हॅल्यू’साठी साडेआठ हजार रुपये आहे. हे विमान दररोज सकाळी ५.०५ वाजता बंगळुरूहून निघेल आणि परतीच्या प्रवासाला काठमांडूहून सकाळी ९.०५ वाजता उड्डाण करेल. या नवीन मार्गामुळे अमृतसर, भुवनेश्वर, दिल्ली, गोवा, ग्वाल्हेर, हिंडन, हैदराबाद, इंदूर, जम्मू, जयपूर, कोझिकोड यासह भारतातील २० शहरांमधून बंगळुरूमार्गे काठमांडूला एकाच ठिकाणी प्रवास करता येईल.
Fans
Followers